मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम…!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भित नाही…!

Ac- राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या थोड्या दिवसाचा मंत्रिमंडळ स्थापन होईल अनेक मराठा आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत त्यांनी आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावं विधानभवनात मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडावेत मुख्यमंत्री कोणीही झाले तरी मला फरक पडणार नाही मी माझ्या समाजासाठी उपोषणावर ठाम असल्याचे मत मनोज जंगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तरीही मला फरक पडणार नाही कारण या अगोदरही ते सरकार मध्ये होते त्यांनी काय केलं कसं केलं आणि काय करायचं कसं करायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आम्ही कुणाला भिणारे मराठी नाहीते आणि मराठा बांधवांनी दुसरीकडे कुठेही उपोषण न करता फक्त अंतरवली सराटीमध्येच उपोषण होणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय मी काही दिवसात याची तारीख सांगणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत थांबा यामध्ये कोण मुख्यमंत्री होते कुणाला कोणते मंत्रिपदे मिळतात आणि मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे माझं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे मी माझ्या मराठा समाजासाठी उपोषणावर ठाम आहे असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours