जामनेर शहरात लागलेल्या अनधिकृत होर्डिंग ्स आणि जाहिरात फलकांवर त्वरित कारवाई करण्यात याव्या अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.
जामनेर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील पथदिव्यांवर त्याचबरोबर प्रत्येक चौकात अनधिकृत पणे जाहिरात आणि होर्डिंग लावलेले आहेत. ज्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. त्याचबरोबर परवानगी नसताना देखील शहरातील पथदिव्यांवर शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत. तसेच शहरातील अनेक चौकात नगरपालिकेची परवानगी न घेता मोठमोठे बॅनर लागलेले आहेत. अनेकदा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड स्थानिकांनी केली होती. तसेच नगरपालिकेचे कर्मचारी गजानन माळी यांनी पथकारांशी उद्धट बोलून काय करायचं ते करून घ्या असं म्हटलं होतं.

या संदर्भात आज पत्रकार मोहन दुबे आणि पत्रकार सागर लव्हाळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना शहरातील अनधिकृत पणे लावण्यात आलेल्या जाहिरात बाजी बद्दल माहिती दिली. त्याचबरोबर नगरपालिकेच्या उद्या बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली होती. यानंतर लागलीच गिरीश महाजन यांनी नगरपालिकेचे सीईओ बागुल यांना फोनवरून कारवाईच्या सूचना दिल्या , त्याचबरोबर उद्या बोलणाऱ्या गजानन माळी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा सूचना देखील केल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील चौकात फक्त महापुरुषांचे बॅनर किंवा पोस्टर लागले पाहिजे , कुणाच्याही शुभेच्छांचे किंवा वाढदिवसाचे बॅनर अनधिकृतपणे कुठेही लागता कामा नये असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता जामनेर शहरात अनधिकृतपणे जाहिरात करणाऱ्यांवर जामनेर नगरपालिका कारवाई कधी करणार असा स्थानिकांचा प्रश्न आहे.
+ There are no comments
Add yours