जामनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जामनेर नगरपालिकेच्याच बुळाखाली अंधार आहे. नगरपालिका इमारतीच्या मागील बाजूस घाणीच साम्राज्य असल्याचं चित्र आहे. नागरी स्वच्छतेचे प्रबोधन करणाऱ्या नगरपालिकेच्या शासकीय कार्यालयाच्या इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य, आणि शासकीय इमारतींची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
जामनेर नगरपालिकेतील नगर परिषदेच्या इमारतीच्या मागेच तुडूंब भरलेली गटार, गटारी मध्ये कचऱ्याचा ढीग आहे.
नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे काम सध्या सुरू आहे मात्र नवीन इमारतीच्या समोर आणि जुन्या इमारतीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याचं चित्र आहे. या इमारतीत शासकीय अधिकारी कर्मचारी काम करतात. मात्र कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना इमारती मागची घाण दिसत नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

त्याचबरोबर शहरातील जिल्हा परीषद मराठी शाळा वाकी रोड च्या समोर उघड्यावर असलेल्या गटारींची अनेक वर्षांपासून साफसफाई देखील झालेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील अनेक भागातील नाले घाणीने तुडूंब भरलेले आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत प्रशासन किती जागृत आहे हे दाखवून देते.
स्वच्छ्ता गृहांची कमतरता:
जामनेर नगरपालिका परिसरात एकही स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासकीय इमारत असो किंवा आजूबाजूच्या परिसरात देखील एकही स्वच्छतागृह नसल्याने महिला किंवा पुरुषांना त्रास सहन करावा.
शहर, गाव स्वच्छ रहावे व कचऱ्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणुन केंद्र शासन तथा महाराष्ट्र शासन वेळोवेळी आध्यादेश जारी करत आहेत.तसेच कचरा व्यवस्थापकाचे नवीन नियम बनवत आहेत मात्र जामनेर नगर परिषद प्रशासन कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात तिन तेरा वाजवत असल्याचे चित्र दिसत आहे.नगरपालिकेत सद्या प्रशासन राज चालू आहे याकडे कोण लक्ष देईल का ? स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी येतो मग तो निधी जातो कुठे ? कचराकुंड्या आहेत कुठे ? घंटागाडी कधी येथे कधी जाते जनतेचा प्रश्न ? असे विविध प्रश्न जामनेर शहरातील नागरीकाना पडलेला आहे.
+ There are no comments
Add yours