संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी डी.बी.टी वितरण कागदपत्रे गोळा करणे कॅम्प आयोजन बाबत

जामनेर(प्रतिनिधी)संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी.द्वारे लाभार्थ्यांचे थेट खात्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. DBT पोर्टलवर On Board (Adhar Validate व Adhar Validate न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत देण्यात येणार आहे. On Board व Adhar Validate नसलेल्या तसेच DBT पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य माहे फेब्रुवारी २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे.

तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी. द्वारे करण्याबाबचत निर्देश दिलेले आहे. सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची खाती आधार सलग्न असणे आवश्यक आहे. सदरचे कामकाज हे तातडीने पूर्ण करणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहे. या करिता संगायो व श्रावणबाळ याजनेतील बैंक पासबुक/आधार कार्ड / लाभार्थ्यांची जन्म तारीख वय त्यांचा जातीचा संवर्ग तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक तसचे लाभार्थ्यांचे दिव्यांग असल्यास त्यांचे प्रमाणपत्र व किती टक्के अपंग आहे. त्यांचे उत्पन्न किती आहे. याबाबत लाभार्थ्यांचे माहिती सादर करावयाची आहे. माहे जानेवारी 2025 अखेर पावेतो सदर लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे.जामनेर तालुक्यातील एकूण १३००० लाभार्थ्यांना पैकी अद्याप ६००० लाभार्थी यांची वरील नमूद माहिती अप्राप्त असल्याने जामनेर तालुक्यातील खालील गावांमध्ये लाभार्थी माहिती गोळा करणे कामी खालील प्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर दिवशी संबंधित ग्राममहसूल अधिकारी,महसूल सेवक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तसेच संजय गांधी योजना शाखा अधिकारी व कर्मचारी देखील कॅम्प ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

गावनिहाय कॅम्प आयोजित

दिनांक 1 नेरी बु. दि.16/01/2025
2 शेंदुर्णी दि.17/01/2025
3 पहूर दि.20/01/2025
4 फत्तेपूर दि.21/01/2025
5 देऊळगांव दि.22/01/2025
6 नाचणखेडा दि.23/01/2025
7 पाळधी दि.24/01/2025
8 तोडापूर दि.27/01/2025
9 जामनेर दि.28/01/2025

तरी नमूद गावाचे लाभार्थी यांनी कैंप ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक माहिती तातडीने आपले गावचे तलाठी यांचेकडे न चुकता जमा करण्याचे आवाहन तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांनी केले आहे .

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours