जामनेर शहरात रंगली सुडाच्या राजकारणाची चर्चा!
जामनेर
जामनेर शहरात भाजपचे गिरीश महाजन हे सातव्यांदा निवडून आले आणि मंत्री झाले. विरोधकांनी देखील आपली बाजू ठाम मांडली . मात्र आता मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा क्षेत्रात सुडाचे राजकारण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या तरुणांनी निवडणुकीच्या दरम्यान भाजप पक्षाचे तसेच गिरीश महाजन यांचे काम केले नाही. अशा अनेक नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याची ओरड शहरभर होत आहे.
जामनेर विधानसभा क्षेत्रातून गिरीश महाजन निवडून आले खरे मात्र त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मत मिळाली. ज्यामुळे गिरीष महाजन प्रचंड नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. यासाठीच त्यांच्याच जवळचे काही ठराविक कार्यकर्ते आता अनेकांना नाहक त्रास देत असल्याच बोललं जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि महायुतीचे सरकार स्थापन होऊन महिने उलटले. मात्र आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरामध्ये निवडणुकीनंतर सुडाच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या पक्षासाठी ज्यांनी निवडणुकीदरम्यान काम केले नाही अशांवर काही स्थानिक नेते तिरकस डोळा ठेवून त्यांना त्रास दिला जात असल्याची चर्चा होत आहे.
चिंचखेडा बुद्रुक येथील जवळपास सहा तरुणांना निवडणुकीदरम्यान भाजपचे काम न केल्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप काही तरुण सोशल मीडियावर करत आहेत. यामागे चिंचखेडा बुद्रुक येथील स्थानिक राजकारण्यांनी गिरीश महाजन यांच्या जवळच्या व्यक्तीला तरुणांनी भाजपचे काम केलं नसल्याची माहिती दिली. त्यानंतर या सहा तरुणांना कामावरून काढून टाकण्यात आले. या सगळ्या मागे भाजपचा एक स्थानिक नेता जो गिरीश महाजन यांच्या जवळचा आहे तोच हे सगळं सुडाच राजकारण करत असल्याची चर्चा आहे. भाजप पक्षाचे काम न केल्यामुळे ठेकेदारांना दम देऊन सहा तरुणांना कामावरून काढून टाकले. ज्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात काही तरुणांनी पोलीस ठाण्यात देखील धाव घेतलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची आणखीनच जोरदार चर्चा जामनेर शहरात होत आहे.
दुसरीकडे गिरीश महाजन हे मंत्री झाल्यापासून त्यांना भेटणं नागरिकांना अवघड झाले असल्याची देखील चर्चा आहे. मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या जवळील काही स्थानिक नेते नागरिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. गिरीश महाजन नेहमी जनतेच्या संपर्कात असणारे नेते आहेत मात्र त्यांच्या जवळील काही कार्यकर्ते त्यांना जनतेपासून दूर घेऊन जात असल्याची चर्चा आहे.
मंत्री गिरीश महाजन हे आपल्या जामनेर विधानसभा क्षेत्रात लक्ष देऊन सूडाच्या होणाऱ्या राजकारणावर नेमकी आपली भूमिका काय घेतील, किंवा बेरोजगार झालेल्या चिंचखेडा बुद्रुक च्या सहातरुणांना आपला रोजगार पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.
विकासाचे मुद्दे किती, जनहिताचे मुद्दे किती यापेक्षा एकमेकांची जिरवाजिरवीच अधिक असंच काहीसं चित्र जामनेर विधानसभा मध्ये सध्या आहे.
+ There are no comments
Add yours