बोगस नोंदणीसाठी मोठ्या नेत्याच्या नावाचा केला जात आहे वापर!
पैसै द्या आणि बांधकाम कामगार व्हा – जामनेर तालुक्यात सुरू आहे बोगस बांधकाम कामगार नोंदी चा फंडा
जामनेर
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदणी ची संख्या वाढली आहे. बोगस दाखले देऊन या योजनेचा काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे.
शहरातील काही ठराविक दुकानांवर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चक्क बोगस दाखले दिले जात आहेत, ज्यामुळे खरे बांधकाम कामगार लाभार्थी योजनेपासून वंचित ठेऊन बांधकाम कामाशी काहीही संबंध नसलेल्यांची सर्रास नोंदणी सुरू आहे. या बोगस नोंदणी साठी लाभार्थींकडून 900 ते 1500 रुपये आकरले जात आहे.एक हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा, सोबतच इंजिनिअरच्या ९० दिवसांच्या कामाचा बोगस दाखला घ्या, बांधकाम कामगार बना, असा फंडा कामगार नोंदणीमध्ये सुरू आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण नोंदणी झाल्यानंतर त्या कामगारांना गृहोपयोगी साहित्यासह लग्नकार्य, प्रसूती, शिक्षणासह इतर कारणांसाठी आर्थिक मदत दिली जाते.
हा लाभमिळविण्यासाठी जामनेर कार्यालयात बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. ती नोंदणी थांबविण्याबाबत संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
अधिका-यांनी फिल्डवर जाऊन त्या कामगारांचा कामावरच फोटो काढायचा आहे , त्याठिकाणीच सर्व त्यांची कागदपत्रे घ्यायची आहेत. पण हेच अधिकारी कर्मचारी नियमाचे पालन करत नाहीत.
त्यामुळे सध्या जामनेर तालुक्यात बोगस कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगाराने मंडळाकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी लागणारे वयाचे पुरावे, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बैंक ,पासबुक, रहिवासी पुरावा द्यावा लागतो. परंतु तसे न करता एजंटांना दीड ते दोन हजार रुपये दिले की कामगार नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते.
यासाठी एजंटांनी खुलेआम दुकाने थाटली आहेत.ज्याने कधी विट, दगड, सिमेंटच्या कामाला हात लावला नाही. कामाची साधी सवय नाही अशा व्यक्तीला बांधकाम कामगाराची नोंदणी सहज मिळत आहे. चांगल्या घराण्यातील महिला व पुरुषांनी कामगार नोंदणी करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. चांगल्या घराण्यातील व्यक्तींची नोंदणी कामगार म्हणून केली जात आहे. पण ख-याअथनि जे कामगार आहेत ते मात्र नोंदणी प्रक्रियेपासून अलिप्त राहात असल्याचे दिसून येते.
तालुक्यातील बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे खरा कामगार हा शासनाच्या लाभापासून वंचित राहात आहे. त्यामुळे संबंधित अधिकां-यावर कारवाई करावी.अशी नागरीकांची मागणी आहे.
राजकीय व्यक्तीचे नाव घेऊन दिला जातोय त्रास!
जामनेर शहरातील मोठ्या नेत्याच नाव घेऊन काही ठराविक कार्यकर्ते तर्फे बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदी केल्या जात आहेत. आणि नागरिकांकडून 1200 ते 1500 रुपये घेऊन बोगस बांधकाम मजूर असल्याचे शासकीय अभियंत्यांकडून प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. बांधकाम कामगार नोंदी केल्यानंतर कार्ड घेण्यासाठी देखील राजकीय व्यक्तीचे नाव वापरले जात आहे. हा सगळा गोंधळ शहरातील काही झेरॉक्स दुकानांवर आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळ च्याय कार्यालयात सर्रास सुरू आहे.
जामनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील अशाच एका तोतया एजंट ने अनेक नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक केली होती. बांधकाम कामगारांचे कार्ड बनवून देतो असं सांगून संबंधित व्यक्तीने अनेक नागरिकांकडून पैसे घेऊन पसार झाला होता. या सगळ्या भोंगळ कारभारामागे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा देखील हात असल्याची चर्चा आहे.
बांधकाम कामगार योजना नेमकी काय ?
या योजनेत मजुरांला अनेक फायदे मिळतात. ज्यामध्ये स्वत:च्या विवाहासाठी गृहोपयोगी भांडी, मुलीच्या विवाहासाठी, पत्नीच्या प्रसूतीसाठी, प्रसूतीमधील सिझरिंगसाठी, गंभीर आजारांवरील उपचारासाठी, अपंगत्व आल्यास व व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी या माध्यमातून मदत केली जाते. पहिली ते अभियांत्रिकीपर्यंतच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात. कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास, नैसर्गिक मृत्यू झाल्यासही मदत दिली जाते.
बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी मदत केली जाते. याशिवाय त्याच्या विधवा पत्नीस प्रतिवर्षी २४ हजार रुपये पाच वर्षांपर्यंत मिळतात. अशा या सर्व योजनांचा लाभ कामगार नोंदणी झाल्यानंतर दिला जातो.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार नसतानाही बोगस कामगार आहे, अशी नोंदणी केल्या जात आहेत.
जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची नोंद होत आहे. त्यामुळे या बोगस लाभार्थ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी खरा मजूर करत आहे.
+ There are no comments
Add yours