जळगाव: कंटेनर ची दुचाकीला धडक – दुचाकी स्वराचा जागेचा मृत्यू 

जळगाव जिल्ह्यामध्ये अपघाताचे सत्र थांबता थांबत नाहीये. शहरात पुन्हा एकदा डंपरच्या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार दि. ५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

जळगाव शहरात महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विजय नामदेव भोई (४५, रा. आशाबाबा नगर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मयत हा एक टपरी चालक आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील शिवकॉलनी येथील पान टपरी चालक विजय भोई रात्री घरी जात होता. तेव्हा पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनर ne दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत ओढत नेले. त्यात विजय भोई गंभीर जखमी झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

अपघाताच्या बातमीने स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. अपघातानंतर नागरिक महामार्गावर उतरले आणि रास्ता रोको केला. त्यांचे म्हणणे होते की, महामार्गावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेत प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक ठप्प झाली होती.

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली आणि त्यांना शांत केले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अपघातातील मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

महामार्गावर होणारे अपघात, तसेच त्यावर प्रशासनाची योग्य कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये निराशा दिसून येत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours