जामनेर: कॉलनीतील रस्त्यांची काम अर्धवट – नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

जामनेर शहरातील विविध भागात, हद्दवाढ क्षेत्रात रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत  नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागात सिमेंट चे रस्ते केले  जात आहेत. मात्र याच रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरापासून बंद पडल्याने विकास रखडल्याची चर्चा होत आहे. 

जामनेर शहरातील अनेक भागात कोट्यवधींचे रस्ते मंजूर झाले, मात्र ही कामेच जामनेरवासीयांसाठी वैताग आणणारी ठरत आहेत. पाटील वाडी, चांगदेव नगर, गणेश वाडी, धनपुष्प कॉलनी मध्ये मुख्य रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी जुने चांगल्या स्थितीत असणारे रस्ते खोदून ठेवले आहेत, मात्र महिना उलटत आला तरी रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे.अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावल्याची नागरिकांची ओरड आहे. 

नागरिकांची कसरत सुरू

पाटील वाडी भागातील प्रमुख रस्ते गेल्या  महिन्यभरापासून अपूर्णावस्थेत आहेत. जामनेर नागरपालिके कडून या रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे का रखडली याच उत्तर कुणी देत नाहीये.  काही ठिकाणी काम सुरू असले तरी त्याला म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे कामे सुरू झाल्यानंतरही नागरिकांची कसरत संपलेली नाही. कुठे पाइपलाइनचे काम, कुठे रस्त्याचे काम, कुठे नाल्यावरील पुलाचे काम आदी कामे लवकर होत नाहीत, त्यामुळे हे अडथळे अनेक दिवस तसेच असतात. त्यामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत. अनेक वाहनधारकांना रस्ता ब्लॉक असल्याचे माहीत नसते त्यामुळे ते ब्लॉक असलेल्या ठिकाणापर्यंत पोहचतात आणि नाइलाजास्तव पुन्हा मागे फिरतात. शिवाय आहे तश्या रस्त्यातून वाहन चालवत जीवाशी कसरत करावी लागते. सोबतच अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो.

कामे कधी पूर्ण होतील?

रस्त्याची कामे सुरू असली तरी ती कधी पूर्ण होतील, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. संथगतीने कामे होणार असतील तर आणखी पावसाळा येईल, असे म्हणण्यापर्यंत वाईट चित्र आहे.संबंधित यंत्रणांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही, असेच  पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात काम करणाऱ्या संबंधित यंत्रणाच  ढिम्म स्टाइलने काम करत आहेत. लोकप्रतिनिधींनाही त्या जुमानत नाहीत, असेच यातून दिसते. अन्यथा ही कामे कधीच पूर्ण झाली असती. रस्त्यांची अर्धवट कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच शहरातील विरोधक देखील सुस्त पडल्याची चर्चा आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours