जळगाव : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद तसेच जळगाव जिल्हा तलाठी संघ यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑनलाईन जमा करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमातून संकटाच्या काळात प्रशासन व नागरिक यांचे परस्पर सहकार्य हेच खरी ताकद असल्याचा संदेश दिला गेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत जमा झालेली रक्कम थेट पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचणार आहे.
नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑनलाईन योगदानासाठी अधिकृत संकेतस्थळ cmrf.maharashtra.gov.in वर थेट पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.
“आपला छोटासा खारीचा वाटाही मोठा आधार ठरू शकतो. चला, आपण सर्वजण मिळून पूरग्रस्त बांधवांना मदत करूया,” असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
+ There are no comments
Add yours