जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता या अभियानाची सुरुवात होणार असून सकाळी ७ ते १०.३० या वेळेत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत. शहरातील विविध भागांमध्ये स्वयंसेवकांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.
सदर अभियानाचे वृत्तांकन करण्यासाठी सर्व पत्रकार संघ व सार्वजनिक उत्सव मंडळांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून स्वच्छ आणि सुंदर जामनेर घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
+ There are no comments
Add yours