IMPACT : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यावर बसलेली धूळ प्रशासनाने केली साफ
जामनेर शहरात निवडणुकीच्या तोंडावर महापुरुषांचे पूर्णाकृती, अर्धाकृती पुतळे उभारण्यात आले होते. मात्र, जयंती किंवा पुण्यतिथी असल्यावरच पुतळ्यांची स्वच्छता केली जाते. इतर दिवस महापुरुषांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी आम्ही जामनेर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रविकांत डांगे यांच्याकडे केली होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांकडून तत्काळ महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची दरमहा स्वच्छता व्हावी,’ अशी देखील मागणी जामनेर नगरपालिका प्रशासनाकडे होत आहे.
जामनेर शहरांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य पुतळे उभारण्यात आले होते. अजूनही या भीमसृष्टी आणि शिवसृष्टीचे काम सुरूच आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांवर धूळ बसल्याने अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी आम्ही जामनेर नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी रविकांत डांगे यांनी मागणी ऐकताच शहरातील दोन्ही पुतळ्यांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. दोन्ही पुतळे स्वच्छ धुतल्यानंतर आसपासचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला आहे.
मुख्य रहदारीच्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे असल्याने पुतळ्यांवर धूळ साचललेली असते. त्यामुळे शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे प्रत्येक महिन्याला स्वच्छ पाण्याने धुवावेत त्यांचबरोबर आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी जामनेरवासियांची मागणी आहे.
+ There are no comments
Add yours