नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी पाचवा दिवस आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच विधिमंडळात सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विधानपरिषदेतील चर्चेवेळी मंत्री गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे अशी खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले.
विधानपरिषदेत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे वातावरण चांगलेच तापले होते. निर्देश करत सदरे नावाच्या पीआयने आत्महत्या कुणामुळे केली हे स्पष्ट करण्याची मागणी केली. तर वाळू माफिया, अवैध उत्खनन केल्याचा खडसेंवर गंभीर आरोप केला. यामुळेच कुटुंबातील लोकांना 3 वर्ष जेलमध्ये राहावे लागल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. तर खडसेंकडून देखील जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा आणि अवैध धंदे महाजन यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप केला.
वाळू माफिया, अवैध उत्खनन केल्याचा गंभीर आरोप गिरीश महाजन यांनी केला. यामुळेच कुटुंबातील लोकांना 3 वर्ष जेलमध्ये राहावं लागल्याचा आरोप महाजनांनी केला. खडसेंकडूनही जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा आणि अवैध धंदे महाजन यांच्या आशिर्वादाने सुरू असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. विधान परिषदेमध्ये खडसे आणि महाजन यांच्यात खडाजंगी झाली आहे.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातल्या या खडाजंगीनंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिवसाचं कामकाज संपवलं, तसंच वैयक्तिक टीका टिप्पणी करू नका, असंही सभापती म्हणाले.
+ There are no comments
Add yours