जामनेर : नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम – मात्र कायम स्वरूपी उपाय योजना काय?

हातावर पोट असणाऱ्यांसाठी नगरपालिका काय उपायोजना करणार?

जामनेर शहरात आज पुन्हा नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये अनेक अतिक्रमण धारकांवर बुलडोझर चालवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून जामनेर शहरात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, अनेकदा अतिक्रमण विभागाच्या कारवाया देखील करण्यात आल्या. मात्र कारवाई नंतर काही दिवसातच परिस्थिती जैसे थे अशी होते. 

आज पुन्हा जामनेर शहरात अतिक्रमण विभागामार्फत वाकी रोड आणि जामनेर पोलीस स्टेशन समोरील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वाद देखील घातला. काही दुकानांवर, टपरी धारकांवर कारवाई केल्यानंतर अतिक्रमण कारवाई थांबविण्यात आली.

अतिक्रमणांबाबत अधिकाऱ्यांना सूचना

शहरातील वर्दळीच्या परिसरातील अतिक्रमण तातडीने काढण्याबाबत अनेकांनीतक्रारी केल्या होत्या. या ठिकाणी अतिक्रमणांमुळे हाेणाऱ्या असुविधा त्यांनी निदर्शनास अाणून दिल्या हाेत्या. त्यानुसार संबंधित अतिक्रमण तातडीने काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून काही दिवसांच्या अंतरावर अतिक्रमण कारवाई सुरू आहे. 

अपघात, वादही वाढले…
रस्त्यावरील अतिक्रमण धारकांमुळे /विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊन अपघात अाणि वाद हाेण्याचे प्रमाणही वाढले अाहे. अशा वेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांसह पाेलिसांनीही कारवाई करण्यासाठी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे.

कायमस्वरूपी उपाय व्हावेत….
जामनेर शहरातील नगरपालिका चौक, मुख्य बाजारपेठ, पाचोरा रोड,  ,वाकी रोड, जळगाव रोड, पोलीस स्टेशन अशा परिसरातील अतिक्रमण अनेकदा नगरपालिकेच्या पथकाने हटवले तरी दुसऱ्याच दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ चित्र असते. यामुळे प्रशासनाचे अपयश अधाेरेखित हाेत असून, कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी हाेत अाहे. त्याचबरोबर अतिक्रमण धारकांना देखील पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी जामनगरपालिकेने घ्यायला हवी . शहरातील अनेक जण बेरोजगार असल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी टपरी किंवा हातगाड्या लावून पोट भरतात. त्यामुळे अतिक्रमण धारकांना योग्य पर्याय जागा उपलब्ध करून दिली तर त्यांचा देखील उपयोगीचा प्रश्न कायमचा मिटू शकतो.

रिक्षाचालकांच्या मुजारीकडे कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर…
त्याचबरोबर शहरातील ठराविक चौकांमध्ये रिक्षाचालकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू असते. यासाठी थेट रस्त्याच्या मधाेमध रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जाताे. या ठिकाणी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या वाहतूक बेटालाच या बेशिस्त रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असल्याने अन्य वाहनचालकांना रस्ता काढणे जिकिरीचे हाेऊन जाते. परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी माेहीम राबवून कारवाई केल्यास हे चित्र पालटून रस्त्यांना माेकळा श्वास घेणे शक्य हाेईल.

फुटपाथ हरवले…

जामने शहरातील मुख्य रस्त्याला असणारे फुटपाथ हरवल्याचे चित्र आहे. कारण याच फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने मांडली आहेत. ज्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. तर अनेक ठिकाणी फुटपाथ नसल्याने देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours