केकतनिंभोरे येथे गावकरी आणि सरपंचमध्ये हाणामारीचा प्रकार

जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे अनेक विकास कामं रखडल्यामुळे संतप्त गावकरी आणि सरपंच यांच्यात वाद झाला आणि या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली ही घटना सोमवार रोजी संध्याकाळी घडली आहे. गावकरी आणि सरपंच यांच्यात झालेल्या हाणामारी नंतर प्रकरण थेट जामनेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले मात्र त्यानंतर हे प्रकरण आपापसात समजूत काढून मिटविण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. 

केकत निंभोरा गावात अनेक सरकारी योजना रखडल्यामुळे आणि अनेक टेंडर निघत नसल्यामुळे काही ग्रामस्थ नाराज होते. सोबतच शबरी घरकुल योजना आणि इतर योजनांचा पैसा येऊन काही लाभार्थ्यांना मिळाला देखील आहे मात्र ग्रामपंचायकडून विकास कामे आणि  शबरी घरकुल योजनेत लाभार्थ्यांना जागा देणे जमले नाही. सोबतच 15 वित्त आयोगाची कामे अनेकदा पदाअधिकारी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करतात ,इतरांना टेंडर मिळू न देण्यासाठी काम करतात अशी टीका देखील गावकऱ्यांनी केली आहे. यावरून आपलं गाव या गावाच्या सोशल मीडियाच्या ग्रुप वर काल अनेकांनी या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर या चर्चेतून वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने काही ग्रामस्थ आणि सरपंच यांच्यात वाद चिघळला आणि प्रकरण हाणामारी पर्यंत गेले. प्रकरण मिटवण्यासाठी जामनेर पोलिसांनी देखील मध्यस्थी केली त्यानंतर हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले. सोबतच काही ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार दिली आहे.  केकत निंभोरा गावात विकास कामे का रखडली आणि यावरून गावांमध्ये दोन गटात खडा जंगी का होत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours