जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील उत्रान गावाच्या हद्दीत सर्रास 40 ते 50 ट्रॅक्टर आणि मशिनद्वारे वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे सगळ सुरू असल्याची चर्चा तालुक्यातब्रंगली आहे.
उत्रान गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू चा दिवसा उपसा सुरू आहे. 40 ते 50 ट्रॅक्टर, 6 क्रेन द्वारे रोज वाळू उपसा करून ख्वाजा मियां दर्गा जवळ तीन ठिकाणी जवळपास सव्वाशे ते दीडशे ब्रास वाळूचा साठा केलेला होता. या संदर्भात 112 नंबर वरून पोलिसांना माहिती दिली असता अखेर काही तासानंतर पोलीस , तहसील आणि महसूल प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे ब्रांच वाढू जप्त करण्यात आली असून नेमकी ही वाळू उपसा करणारे कोण यांचा तपास केला जात आहे. कारवाईला उशीर झाल्याने सर्व ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळून गेल्याने प्रशासनाच्या हाती फक्त रेतीचे ढिगारे लागले आहेत.

112 या नंबर वर अतिशय शीघ्र मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन द्वारे करण्यात येते. मात्र 112 नंबर वर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर देखील जवळपास दोन तासानंतर पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर अखेर ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून होणाऱ्या या विलंबावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उत्रान गावामध्ये रेती माफिया कोण? साठा केलेली वाळू कुणाची आहे याचा तपास आता पोलीस करीत आहे
दुसरीकडे रवंजे येथे देखील मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वाळूची तस्करी केली जात आहे. येथे देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने गिरणा नदीतून वाळूचा उपसा केला जात असून त्याचा अनेक ठिकाणी साठा केला जात आहे. या सर्व साठ्यांबद्दल पोलीस आणि तहसील प्रशासनला नेमकी माहिती कशी मिळत नाही किंवा प्रशासनाचाच आशीर्वादाने वाढून आपल्या काम करतात का असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रवंजें गावच्या हद्दीत देखील अनेक ठिकाणी रेतीचा साठा केला आहे, आणि मुद्दा रात्रीच्या अंधारात या रेतीची डंपर मार्फत वाहतूक करून प्रशासना चा महसूल बोलायला जात आहे. अनेक तक्रारीनंतर देखील प्रशासनाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
+ There are no comments
Add yours