जळगाव: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निम येथील तिसरी व सातवीतील दोन शाळकरी मुले दि. २ रोजी तापी नदीत दुपारी ४ वाजता पोहायला गेले असतांना दोघे पाण्यात बुडाली. यात एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. चेतन अरुण सुतार (वय १०) व इयत्ता सातवीतील हरीश बाळू पाटील (वय १२) अशी बुडालेल्या या बालकांची नावे आहेत
पोहणारे रात्री उशिरापर्यंत घेत होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील निम येथील इयत्ता तिसरीतील चेतन अरुण सुतार (वय १०) व इयत्ता सातवीतील हरीश बाळू पाटील (वय १२) हे दोघे काल मंगळवारी संध्याकाळी तापी नदीत पोहायला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण तापी नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांचा शोध घेतला. आता प्रयत्नानंतर रात्री उशिरा चेतन अरुण सुतार या मुलाचा मृतदेह सापडला असून त्यास डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. चेतन सुतार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हरीश पाटील याचा शोध पट्टीचे पोहणारे नागरिक उशिरार्पत घेत होते. दरम्यान, तलाठी जितेंद्र जोगी यांनी रात्री उशिरापर्यत तापी नदी काठी थांबून नाविकांची ही शोध घेण्यासाठी मदत घेतली. घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जिभाऊ पाटील, सहायक फौजदार फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांनी भेट देत पंचनामा केला.
+ There are no comments
Add yours