तालुका स्तरीय तक्रार निवारण सभा आणि ZP सीईओ मीनल करनवाल यांनी बीडिओ आणि अधिकाऱ्यांनाच धरले धारेवर 

CEO मॅडम आल्या आणि पंचायत समितीला लागली एक दिवसापूर्ती शिस्त 

सीईओ मीनल करनवाल यांनी जामनेर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेत मोजकेच लोक असल्याने सभेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

सीईओ मीनल करनवाल यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

जामनेर पंचायत समितीच्या वतीने आज जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद च्या सीईओ मीनल करणवाल यांची उपस्थिती लाभली होती. मात्र ढिसाळ नियोजन आणि नागरिकांच्या तक्रारी पाहता त्यांनी पंचायत समितीचे बिडीओ श्रीकृष्ण इंगळे यांना चांगलेच धारेवर धरले होते. 

तालुकास्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते खरे मात्र या सभेला मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. त्यामुळे तक्रार निवारण सभेची माहिती सर्व गावांना दिली होती का, गावात दवंडी पाठवली होती का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे सीईओ मीनल ककरनवाल यांनी बिल्डिंगच्या अस्वच्छतेबद्दल व्हिडिओ यांची कान उघडणे केली. सोबतच जांभळ्या पंचायत समितीची इमारत चांगली आहे मात्र इमारतीमधील अस्वच्छते वर रंगरंगोटी करा अशा सूचना बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांच्याकडे केल्या आहेत.  त्यानंतर बैठकीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होणारी कामे, ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना समस्या, नागरिकांच्या तक्रारी ज्यामध्ये अनेक जणांच्या घरकुलचे पैसे आले नसल्याची तक्रार होती, ग्रामसेवकांनी काही व्यक्तींना त्यांच्या शेतात विहिरी असताना देखील विहीर मंजूर करून दिल्याच्या तक्रारी होत्या अशा अनेक समस्या जिल्हा परिषद सीईओ यांनी जाणून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारींवर ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अधिकारींकडून उत्तर मागितल्यावर अधिकाऱ्यांची मात्र बोलती बंद झाली होती. यावर संतापून मीनल करनवाल यांनी श्रीकृष्ण इंगळे यांच्याकडून कामाबद्दल अपेक्षाभंग झाल्याचे खंत व्यक्त केली. त्याचबरोबर पत्रकारांनी तक्रार निवारण सभेबद्दल माहिती नसल्याची माहिती दिल्यानंतर मीनल करनवाले यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा पुन्हा काही दिवसांनी घेण्याचा आश्वासन दिले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापना अंतर्गत येणारे विविध कार्यालये तसेच पंचायत समिती शी संलग्न विविध कार्यालये शी संबंधित अनेक तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित असतात. एवढेच नव्हे तर किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. हा त्रास टळावा त्या सोबतच नागरिकांच्या समस्यावर जागच्या जागी तोडगा निघावा या दृष्टीने जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी महिन्यातून दोन वेळा तालुक्यावर जाऊन तालुका स्तरावर तक्रार निवारण सभा घेण्याबाबत निर्देशीत केले आहे. 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मीनल करनवाल यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लेट लेट लतिफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. मी अधून मधून अधिकारी कर्मचारी यांचे रजिस्टर चेक करत आहे, सोबतच फेस बायोमेट्रिक लावण्या संदर्भात शासनाकडे पी ओ कार्यालयाकडे प्रस्ताव दिला गेला आहे.  त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये फेस डिटेक्शन बायोमेट्रिक बसविण्यात येतील ज्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्यावर निर्बंध लागतील. 

जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांकडे दोन पेक्षा अधिक गाव असू नये, त्यातही ग्रामसेवकाकडे एक ग्रामपंचायत मोठी आणि एक ग्रामपंचायत लहान असायला हवी अशा सूचना मीनल करणवाल यांनी श्रीकृष्ण इंगळे यांना दिल्या आहे. सोबतच जे ग्रामसेवक किंवा पंचायत समिती मधील अधिकारी कर्मचारी यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून बदल्या झाल्या नाहीत त्यांच्यावर देखील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन जिल्हा परिषद च्या सीईओ मीनल करनवाल यांनी दिले आहे.

CEO मॅडम आल्या आणि पंचायत समितीला लागली एक दिवसापूर्ती शिस्त 

पंचायत समिती जामनेर च्या पार्किंग मध्ये बेशिस्त वाहन पार केली जात होती मात्र आज जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांच्या दौऱ्यामुळे पंचायत समितीला एका दिवसापूर्ती का होईना मात्र शिस्त लागली होती. अधिकारी कर्मचारी वेळेवर आले होते,त्याचबरोबर नागरिकांच्या आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या शिस्तीत लावण्यात आले होत्या. एरवी या गाड्या पंचायत समितीच्या जिथे जागा मिळेल तिथे लावल्या जात होते, त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील आपले वाहन चुकीच्या पद्धतीने लावत होते ज्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.उद्यापासून मात्र हे चित्र कायम राहील की पुन्हा जैसे थे परिस्थिती होईल हा मात्र प्रश्न आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours