वैशालीताई सुर्यवंश यांचे प्रेरणादायी मनोगत; “उद्दिष्ट, वेळेचे भान आणि परिश्रम—यशाची त्रिसूत्री”
गोदेगाव (ता. सोयगाव) : श्री सरस्वती भवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला रविवारी उत्साहपूर्ण वातावरण लाभले. मा. सौ. वैशालीताई सुर्यवंश यांच्या शुभहस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात शिक्षण, संस्कार आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

वैशालीताई सुर्यवंश यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “यश मिळवायचं असेल तर उद्दिष्ट स्पष्ट ठेवा, वेळेचे भान ठेवा आणि स्वप्नांच्या मागे अथक परिश्रमाने धावा” असा ठाम संदेश दिला. आत्मविश्वास, शिस्त, वेळेचे महत्त्व आणि पालक-गुरूंचा सन्मान ही चार मूलतत्त्वे आयुष्य घडवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच भविष्यात जबाबदार, सजग आणि संवेदनशील नागरिक म्हणून घडण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या प्रेरणादायी सोहळ्याची शोभा वाढवित कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो डॉ. श्री. श्रीरंगी देशपांडे, मा. सरचिटणीस – श्री स.भु. शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदीपाचा प्रकाश देणारे मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दांनी शाळेचे वातावरण जणू उत्साह, ज्ञान आणि प्रेरणेने उजळून निघाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी पार पडण्यासाठी शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. गावात शिक्षणाच्या क्षेत्रात सरस्वती भवन विद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
+ There are no comments
Add yours