वैदिक गो शाळेतर्फे सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गोमय खताचा उपयोग शेतीमध्ये व्हावा. पण योग्य पद्धतीने जिवाणू, अन्नद्रव्य, पर्यावरण स्वभाव आदी विषयावर सागर धनाड यांनी केंद्र सरकारचा गोबर्धन प्रकल्प कसा व्यापक स्वरूपात या मिशनवर कसा उपयोगी ठरत आहे. याबाबत मार्गदर्शन केले. त्यासोबत उत्पन्न वाढीसाठी लागणारी नवीन टेक्नॉलॉजीसाठी जे काही आधुनिक रिसर्च केलेल्या गोष्टी आहेत. त्याचे मार्गदर्शन इंडियन क्रॉप कल्चरचे सीईओ वानखेडे यांनी केले. गोदूत डॉ. देशमुख, गोपद्म फेडचे प्रदीप महाजन, कर्ण बारी, मयूर फुसे अशी टीम शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी स्थापन करण्यात आली आहे. शेती तज्ञ एम.बी.बारी, भरत राजपूत, गोपाल देवरे, पी. के. पाटील, रोहन लोखंडे यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
जामनेरला वैदिक गोशाळेतर्फे सेंद्रियशेतीबाबत मार्गदर्शन
+ There are no comments
Add yours