विकासासोबत धर्म कार्यही महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नशिराबाद / जळगाव प्रतिनिधी  – धर्म आणि संस्कृतीच्या जतनासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. मंदिर आणि कीर्तन हे समाजाला एकत्र आणणारे केंद्र आहे. त्यामुळे अशा धार्मिक कार्यात सहभाग घेणे गरजेचे आहे. या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. कार्यकर्ते आणि भगव्याच्या आशीर्वादाने मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. विकासाच्या कार्यासोबत धर्मकार्यही महत्त्वाचे असून भगव्याशी इमान राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते वाघुर-वाकी नदी संगमाजवळ वसलेल्या श्री नवनाथ महाराज मंदिर परिसरात आयोजित गोरक्षनाथ महाराज कीर्तन सप्ताह निमित आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

वाघुर-वाकी नदी संगमाजवळ वसलेल्या श्री नवनाथ महाराज मंदिर परिसरात आयोजित कीर्तन सोहळ्या निमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अनिल चौधरी यांनी २० वर्षांपूर्वी मोफत ४ गुंठे जागा या मंदिरासाठी दिली होती, याची आठवण या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित भाविकांना झाली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी अनिल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या गोरक्षनाथ महाराज सप्ताह सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भक्तगणांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केले, तर आभार महंत रवी महाराज यांनी मानले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे , महंत रवी महाराज, चंदू मामा भोळे, विकास धनगर, चेतन बर्हाटे, एकनाथ नाथ, कुंदन पाटील, प्रदीप बोढरे, योगेश पाटील, इतर साधू संत व महंत व भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours