जामनेर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन सुरू आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची प्रकरण नागरिकांकडून केली जात आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
जामनेर तालुक्यातील खादगाव च्या परिसरातील midc रस्त्यावर डोंगराळ भागातून दिवसा अवैध पद्धतीने गौण खनिज (मुरूम) ची चोरी सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोकलँड आणि dnpr च्या साह्याने उत्खनन सुरू आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी भाऊसाहेब डोंगरे , जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना माहिती जे तक्रार करण्यात आली होती. मात्र पाच दिवस उलटून देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोबतच आधी संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तीकडे रीतसर परवानगी आणि सर्व पावत्या असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती मात्र याची पडताळणी केल्यानंतर उत्खनन करणाऱ्या व्यक्तीकडे कोणतीही परवानगी नसल्याची बाब उघड झाली आहे. या सगळ्यानंतर तहसील प्रशासन किंवा मंडळ अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन देऊन देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच कारवाई बाबत मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करुन देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
त्यामुळे करणाऱ्यांना प्रशासनाचा अभय आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गौण खनिज उत्खनन करावयाचे असल्यास ते किती करावे यासाठीचे निकष महसूल विभागाकडून घालून दिले आहेत. शहरात बांधकामांनी जोर पकडला आहे. या बांधकामांसाठी उत्खनन करण्याकरिता तहसील कार्यालयातून प्रती ब्रास ६०० रुपये रॉयल्टी भरुन परवानगी दिली जाते. परंतु याचेही शहरात सर्रास उल्लंघन होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद दिला नाही.
संबंधित गौण खाणी उत्खनन करणाऱ्या व्यक्तीने गौण खनिज उत्खनन परवानगी घेतलेली आहे का? घटनास्थळी किती उत्खनन केले याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन प्रशासनाकडून माहिती घेतली जाणार का? आणि अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर पुढील कार्यवाही होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
+ There are no comments
Add yours