जामनेर –नेरी व पळसखेडा मिराचे परिसरात वादळी वाऱ्यांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, घरे आणि दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब व मा. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही बाब मा. गिरीशभाऊ महाजन (मंत्री, आपत्ती व्यवस्थापन) यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.
तेव्हा गिरीशभाऊंनी जिल्हाधिकारी यांना थेट संपर्क साधून तात्काळ पंचनामे व मदतीच्या कामांना सुरुवात करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
त्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने त्वरेने हालचाल करून कारवाई सुरू केली.
पाहणीवेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , पश्चिम जामनेर तालुका अध्यक्ष कमलाकर पाटील, तुकाराम निकम, अमर पाटील, शेखर काळे, अण्णा पेठोळे, भगवान इंगळे, सुभाष वाघोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours